Monday 15 June 2020

सूर्यास्तानंतर अन्नप्राशन करावे का?

सूर्यास्तानंतर अन्नप्राशन करावे का करू नये, या प्रश्नाचा आयुर्वेद प्रत्यक्ष विचार करत नाही. कारण आज ज्याप्रमाणे तांत्रिक उपलब्धीमुळे रात्र सुरू होणं लांबलं आहे त्या स्थितीचा प्राचीन काळी अभाव असल्यामुळे अंधार पडण्याच्या आधी जेवणे साहजिकच असावे. तेव्हा त्या काळात हा प्रश्नच उद्भवला नसावा.

दिवसाची सुरूवात ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी सुमारे दोन तास सांगितलेली असल्यामुळे झोपण्याची वेळ सामान्यपणे सूर्यास्तानंतर दोन तासाची मानता येते. जेवणानंतर ताबडतोब झोपू नये, सुमारे तासा-दिडतासाचा अवकाश घ्यावा, अशाप्रकारची सूचना आयुर्वेदात असल्यामुळे सूर्यास्तानंतरच्या साधारण तासाभराच्या काळात रात्रीचं भोजन घेतलेलं योग्य व्हावं, असं अनुमान काढता येतं.

No comments:

Post a Comment