Sunday 31 May 2020

राममंदिर आवारात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडण्याच्या निमित्ताने...

या बातमीच्या संबंधात नेहमीप्रमाणे अयोध्येत राम मंदिर नसून बुद्ध विहार होते, अशा आशयाची वक्तव्ये तथाकथित सेक्युलर आणि कम्युनिस्ट नेत्यांद्वारे आली. त्याबद्दल पुढील विचार उतरले....

एक सांगू का? सध्या लोकांनी आपापल्या अस्मितांना टोकदार केलंय म्हणून पण हजारभर वर्षांपूर्वी म्हणजे मुसलमान इथे येण्यापूर्वी सामाजिक स्थिती आज आपण कल्पना करू शकत नाही अशी होती.

वैदिक, जैन, पौराणिक (शैव-वैष्णव), बौद्ध अशा अनेक विचारधारा इथे एकाच वेळी नांदत होत्या. त्यांच्यात वाद होते. शैव-वैष्णव वगैरे पण ते वैयक्तिक होते. त्यासाठी एकमेकांची देवळं फोडण्याचे प्रकार कधीच झाले नाहीत. हा, या देवळातली मूर्ती माझ्या राज्यातल्या देवळात हवी म्हणून मी ती या देवळातून काढून माझ्या देवळात पूजायला नेतो, हे झालंय (विठ्ठल-पुरंदरदास) पण मूर्तीभंजन आपल्याकडे कधीच झालेलं नाही. एखादा चोल राजा शिवच श्रेष्ठ म्हणून वैष्णवांवर अन्याय करतो, म्हणजे काय करतो, तर त्यांच्याकडून शिवाचं श्रेष्ठत्व वदवून घेतो. ज्याला ते पटत नाही तो निषेध म्हणून ते राज्य सोडतो, हे आपल्याकडे घडलंय. शिव श्रेष्ठ म्हणून विष्णुमंदिर तोडलं असं घडलेलं नाही. किंबहुना बुद्ध याच मातीतला असल्याने आणि त्याचा अन्तर्भाव शिव-विष्णूंच्या अवतारात झाल्यानंतर तर अनेकदा देवळांच्या परिसरामध्येच, देवळाच्या इमारतीमध्येच विहारांची रचना होऊ लागली. (पहा - अंबाबाई मंदिरातच एका कोप-यात विहार आहे.) त्यामुळेच त्या काळात टेम्पल काॅम्प्लेक्सेस् बनली, जिथे एकाचवेळी अनेक धर्मपंथपूजनीय तत्त्वांना स्थान दिलं गेलं.

या वास्तविकतेकडे मुसलमानांच्या आगमनानंतरच्या कालखंडातील घटनांच्या दृष्टीने पाहिल्यामुळे धर्मपंथ-सौहार्द न दिसता सतत धर्मपंथ-द्वेषाच्या चष्म्यातूनच इतिहासाकडे बघण्याचा कल वाढीला लागलेला आहे.

रामजन्मभूमीवरील बाबराच्या हल्ल्यापूर्वी असलेल्या रामलल्लाच्या मंदिराच्या स्थापत्यामध्ये अशाच त-हेने विहार अन्तर्भूतही असेल पण शेवटी त्याचा विद्ध्वंस राममंदिर म्हणूनच झाला, विहार म्हणून नाही, हे सत्य आहे.

Thursday 28 May 2020

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्ताने...

खरं तर आपल्याकडे स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः। हे सूत्र फार पूर्वीपासून आहे तरी यातल्या धर्माला रिलिजनच्या पातळीत घेतलेलं नाही. तिथे धर्म म्हणजे वृत्ती, मनोवृत्ती अपेक्षित असते. माझ्या मनोवृत्तीविरोधी काम माझ्यासाठी मृत्यूसमानच आहे, असा त्याचा अर्थ होतो.

इसच्या 10व्या शतकात मुसलमानांच्या टोळ्यांशी युद्धात संबंध आल्यावर धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने आपल्याला ठाऊक झाला. तत्पूर्वी माझी उपासना पद्धती (धर्म) दुस-याला अमान्य असेल तर त्या दुस-याला जगण्याचा अधिकारच नाही, असा विचारच आपल्याकडे नव्हता. हीच सहिष्णुता. मुसलमानांशी संपर्क झाल्यावर त्यांची उपासनापद्धत (इस्लाम) एखाद्याने अमान्य केल्यास ते त्या व्यक्तीला ठार मारतात, हे पहिल्यांदा आपल्याला कळलं. तेव्हाच आणखी एक शब्द आपल्याला कळला, शहादत. इस्लाम ही उपासनापद्धत जगन्मान्य करण्याच्या प्रयत्नात झालेल्या युद्धात जो मरतो, त्याच्या या कृतीसाठी जो शब्द वापरला जातो, तो शहादत. जो ही कृती करतो तो शहिद. असं असल्यामुळे धर्मासाठी (आपल्या नियत वृत्तीसाठी) बलिदान ही संकल्पनाच आपल्याकडे नसल्याने त्या अर्थाचा शब्द आपल्या भाषेत नव्हता. मग भाषाशास्त्राच्या नियमानुसार स्वदेश, स्वजन आणि स्वधर्म (यात उपासनापद्धतीही अन्तर्भूत) यासाठी मृत्यू पत्करणा-यासाठी परकीय प्रकारचा शहिद हा शब्दच आपल्या भाषेत वापरण्यात येऊ लागला. मुसलमानांमध्ये मात्र इस्लामच्या प्रसारासाठी मृत्यू पत्करणा-यालाच शहिद म्हणण्याचा प्रघात आहे. इतर धर्मियांच्या या कृतीसाठी ते कधीही शहिद-शहादत हे शब्द वापरत नाहीत.

हे मर्म केवळ सावरकरांनी जाणलं आणि त्यांनी पर्यायी हुतात्मा हा शब्द बनवून प्रचलित केला. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। हे जाणणा-या सावरकरांनी हुत या म्हणजे आहुती या अर्थाने, प्राणार्पण हेतूने असलेल्या शब्दाला अमर, अजर, चैतन्यमय असा आत्मा शब्द जोडून बनवलेला हुतात्मा शब्द शहिद या शब्दाहून अधिक चपखल आणि मनोज्ञ आहे. यात आत्म्याच्या अमरत्वाला साद घालून स्वदेश, स्वजनांसाठी पुनःपुन्हा प्राणार्पण करण्याने प्राप्त होणा-या हतेषु भोक्षसि स्वर्गम्। या तत्त्वाचाही आधार घेतल्याचं कळतं. त्यादृष्टीने हुतात्मा आणि त्याचंच तद्धित रूप हौतात्म्य हे दोन अप्रतिम शब्द सावरकरांनी आपल्या संस्कृतीशी सुसंगत असे दिले आहेत. या आणि सावरकरांच्या स्वतंत्र प्रज्ञेने निर्माण झालेल्या शब्दांचा आपल्या भाषेमध्ये अधिकाधिक अंगिकार करणं हेच सावरकरांना योग्य अभिवादन ठरेल.

Sunday 17 May 2020

मौके पे चौका

जैसे मैने नजर घुमायी, सम्मुख स्थित नजारा जाना
घने पेड के डाल तले, फिर जम गया मेरा निशाना
स्थान था पर्णाच्छादित और तने शाखाओं के बीच
ध्यान किसी का सहज न जाता कभी वहाँ पर खींच

देखा, दो है पहरेदार वहाँ के लगे चौकन्ने-फुर्तीले
डरावना सा रूप लिये वे निगरानी करते पहले
एक लौट कर आता अन्दर तभी दुजा बाहर जाता
किसी समय भी एक हमेशा स्थानी बन कर रहता

एक क्षण तब ऐसा आया, दक्षिण में कोलाहल पाया
दोनों पहरेदारों की फिर उस दिशा में अटकी माया
लगे देखनें दक्षिण में वे, हटा स्थान से उनका ध्यान
मैने मौका अच्छा जान, किया स्थान के प्रति प्रस्थान

स्थान पहुँच कर जैसी मैने अन्तर्भाग की की परीक्षा
जान गयी मैं, यहाँ पर होगी मेरे माल की पुरी सुरक्षा
स्थान साफ कर दो पलों में रखें वहाँ जिगर के टुकडे
उन वायसों के स्नेहभाव से अब बढते रहेंगे मेरे बछडे

Saturday 16 May 2020

कोरोना के साथ

हवा के झोंके सी हल्की लहरें,
जब गुजरी मेरी मेज पर से,
न जानी जगमगाती चाँदनी,
न शीतलता, न फूल सी खिलती हँसी,
आँखों से मेरे ख्वाब सारे बिखर रहें है,
मेरे छूने से आज मेरे पास कोरोना है...

कुंद सा लगने लगा जीवन मेरा,
अटकी सी रूकने लगी साँसें मेरी,
अखडें हुए शरीर का बढता तापमान,
खाँसी का चढता हुआ प्रमाण,
मुझे मेरे परिवार से अलग कर रहा है,
मेरे छूने से आज मेरे पास कोरोना है...

बुखार की गोली और खाँसी की दवा,
जुकाम का सिरप तथा अज्वाईन का धुवा,
कुछ तो यहाँ काम कर गया होगा,
इन चार दिनों में ज्ञान तो पाया होगा,
रोग के लक्षणों से मुक्ति प्राप्त हो चुकी है,
मेरे छूने से आया कोरोना अब भी मुझमें मौजूद है...

आओ, कोरोना के साथ जी ने का अभ्यास जारी रखें...